Skip to main content

झाडं

कित्येक ओसाड माळरानावर
झाडं एकटीच उभी आहेत
सांगाडे होऊन....

कधीकाळी पडलेल्या
पावसाचे चार थेंब
अगदी पुरवून पुरवून
जगतायत बिचारी
पुढचा पाऊस पडेपर्यंत....

कुठलीही योजना
नकोय त्यांना त्यांच्या जवळपास
कारण, त्याना पिढीजात
अनुभव आहे की,
अवकाळी पाऊस
काय तो एकदाच मारेल
पण या योजना मात्र
रोज मारतील....

-  copyright@vijaybilur.8149....
    रत्नागिरी

Comments

Popular posts from this blog

रेगोटया

रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत                                -  विजय बिळुर                                   ०८ जुलै २०१६

भाकरी

भाकरीच्या तुकड्याचा फक्त प्रश्न होता त्यांनी जातीपातीच्या दंगलीत आमची चुलच जाळली.... जळणाऱ्या पोटाला आन हंबरणार्या ओठाला बघत मग आय बा दोघ बी वाळली.....

म्रुगजळ

पाखरास मिळेना झाड बाधांवया घरटे शोधुन शोधुन दमले बिचारे होई झाडाचें भास नुसते थकुन बिचारे बसले आडोशाला एक पखं वर करुन स्वताच्याच सावलीत....                     विजय बिळुर                     २०१६