ऊशाला असते तुझी सोबत
मी गातो आठवणीतली गाणी
गर्दकाळे नाचता मेघ मग
गळते छप्परातुन पाणी....
वाटते पुन्हा एकदा शेंदावे घर
पण तसेच वाहु देतो
जाईल पाऊस एकदाचा म्हणता
पुन्हा परत तो परतुनी येतो....
चार महीन्यांचा पावसाळा हा
बारमाही होऊन गेला
तु गेल्यानंतर पुन्हा एकदा
छप्पर लागले गळाया.....
- विजय बिळुर
खाडाखोड
रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत - विजय बिळुर ०८ जुलै २०१६
Comments
Post a Comment