Skip to main content
म्या देवासमोर
हात जोडुन देवाला
म्हटलं
यंदा पीक जोमात आलय
हे पहीलं कणीस तु खा
तो गपच व्हता........

दुस-या वर्षी म्हटलं यदां
कायबी ऊगवलं नाय
हे पहील आणि शेवटचं
कणीस तुला
तु खा
तो तव्हाबी गपच होता.....

तिस-या वर्षी गेलो
आणि जाताना कणीस आन
काठी घेऊन गेलो
खातु का नाय रं आं
तो तवाबी गपच व्हता....

मग चौथ्या वर्षी गेलोच नाही
तर त्यानं त्येचा
माणुस पाठवला

तवा पासनं शेतं आन म्या
दोघंबी मरुन पडलोय


                       - विजु

Comments

Popular posts from this blog

रेगोटया

रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत                                -  विजय बिळुर                                   ०८ जुलै २०१६

भाकरी

भाकरीच्या तुकड्याचा फक्त प्रश्न होता त्यांनी जातीपातीच्या दंगलीत आमची चुलच जाळली.... जळणाऱ्या पोटाला आन हंबरणार्या ओठाला बघत मग आय बा दोघ बी वाळली.....

म्रुगजळ

पाखरास मिळेना झाड बाधांवया घरटे शोधुन शोधुन दमले बिचारे होई झाडाचें भास नुसते थकुन बिचारे बसले आडोशाला एक पखं वर करुन स्वताच्याच सावलीत....                     विजय बिळुर                     २०१६